काल म्हणे कोणा शहा वाणीयाने ,
पैठणकराला चोप दिला .
मराठी लोकांची माथी सणकली,
पोलीस म्हणती दोषी दोघे.
दुसऱ्या दिसाला हात बदलले,
पाठही बदले हाताखाली .
कविमन लागे शोधाया तात्पर्य,
श्रेयाला तत्पर संधीसाधू.
लढा तो नव्हता प्रांतप्रांतीयांचा,
वृत्तीवृत्तीतला दोष असे.
यया कारणाने जमला मराठी,
' मॉक ड्रिल ' च मानावे या.
No comments:
Post a Comment